लग्नापूर्वी घरातील वातावरण कसे असेल आणि लग्नानंतर ते कसे बदलते, याकडे एक नजर टाकूया. ह्या लेखात वर्णन केलेल्या परिस्थिती प्रत्येकाच्या घरात असतील असे नाही; काहींच्या घरात यापैकी काही समस्या असू शकतात, तर काहींच्या घरात नसतील. "सामान्य" हा शब्द मी जाणूनबुजून वापरला आहे, कारण अशा समस्या बऱ्याच घरांमध्ये दिसून येतात. ह्या लेखातील अनुभव माझ्या एका जवळच्या मित्राच्या कथनावर आधारित आहेत आणि ते मुलाच्या (नवऱ्याच्या) दृष्टिकोनातून मांडले आहेत.
लग्नापूर्वीची मानसिकता
पालक (विशेषतः आई-वडील) मनातून खूप उत्साहित असतात. आईला "माझं पिल्लू मोठं झालं" याचा आनंद वाटतो, तर वडिलांना "आता माझी जबाबदारी पूर्ण झाली" असं समाधान वाटते. लग्न जवळ आलं की, काकू-मामा, आत्या-मावशी सगळेजण सल्ले देण्यासाठी धावत येतात.
लग्नाआधी पालक आणि नातेवाईक देत असलेले "विशेष सल्ले" स्वतःच एक किस्सा असतात. हे सल्ले कधी हास्यजनक, कधी छुपे हुकूमशाही दर्शवणारे, तर कधी जुन्या पिढीच्या विचारसरणीचे प्रतिबिंब असतात. उदाहरणार्थ:
- "बायकोला डोक्यावर बसू देऊ नको" (म्हणजे, "तिचं हुकूम चालू देऊ नकोस, नाहीतर ती सगळं नियंत्रण घेईल!").
- "मुलीच्या घरच्यांना जास्त चुळबुळ करू देऊ नको."
- "बायकोचा पगार तुझ्या खात्यात असावा."
- "जास्त शिकलेली बायको तुला हुकूम देईल, म्हणून पैसे तुझ्याच नियंत्रणात ठेव."
मुलाच्या मनात पालकांबद्दल अमर्याद आदर असतो. त्याला वाटतं, "मी माझ्या आई-वडिलांना पूर्णपणे ओळखतो!" त्यांचा स्वभाव, आवडीनिवडी, रागप्रसंग—सर्व काही त्याला माहीत असतं. पालक आणि मुलामध्ये मोकळेपणाने संवाद साधला जातो, सर्व काही आनंदात चालत असतं.
लग्नानंतरचे वास्तव
लग्नानंतर सून घरात येते, आणि हळूहळू पालकांचे एक नवे रूप दिसू लागते. मुलाला कधीही दिसले नसलेले त्यांचे स्वभावाचे पैलू उघड होतात.
- सासूचे वागणे:
- भाजी चांगली झाली तर सासू सुनेची प्रशंसा करणार नाही; उलट, ती सासऱ्याला सांगेल, "मीच ही भाजी बनवली." पण भाजी खराब झाली तर सुनेवर ठपका ठेवण्यात येईल.
- सून आणि मुलाच्या समोर सूनबद्दल नेहमी नकारात्मक बोलणे. ५ वर्षांनंतरही सासूने सुनेबद्दल एकही चांगले शब्द काढलेले नसतात.
- सुनेच्या खोलीत जाऊन तिच्या वस्तू (कपाट, पर्स, कपडे) उघडून पाहणे. सून जेव्हा सासूला पकडते, तेव्हा ती काहीतरी सबब सांगते.
- सुनेच्या खाण्यावर लक्ष ठेवणे—किती पोळ्या खाल्ल्या, किती भाजी घेतली—आणि नंतर सासऱ्याला "रिपोर्ट" करणे.
- सून जर नवऱ्यापेक्षा आधी जेवण करत असेल, तर त्यावरही टीका.
- घर स्वच्छ ठेवण्याबाबत सूनवर नेहमी आक्षेप घेणे. सासू मुलाला सांगते, "बघ, तुझी बायको घर झाडत नाही!" (हे सूनला थेट सांगण्याऐवजी.)
- सासू पार्लरला एकटी जाते, पण सुनेला कधीही सोबत घेत नाही. विचारल्यावर खरी हकीकत सांगण्याऐवजी फसवणूक करते.
- शेजाऱ्यांसमोर सुनेची निंदा करणे—"घरात काहीच करत नाही, फक्त स्विमिंगला जाते!"
- सुनेच्या मैत्रिणींशी भेटण्यावरही आक्षेप.
- हळदी-कुंकूच्या कार्यक्रमांवर सुनेला न घेता जाणे.
- स्वतःसाठी चांगल्या साड्या घेणे, पण सुनेला जुन्या कपड्यांत राहायला लावणे.
- मुलाच्या मदतीवर बंदी:
- मुलगा जर घरकामात (पोछा मारणे, झाडलोट करणे) मदत करत असेल, तर त्यावरही आक्षेप—"हे बायकोची कामे आहेत!"
- नातू झाल्यानंतरचे वागणे:
- बाळाची साफसफाई करणे हे "फक्त बाईचे काम" असल्याचा आग्रह.
- बाळाने घरात शी-सु केली तर रागावणे.
- बाळ जर जास्त बडबड करत असेल, खेळत असेल, वस्तू हाताळत असेल, तर त्यावरही टीका.
- बाळाला "बोगस", "गंदा" असे शब्द वापरणे.
- एका बाळाची तुलना दुसऱ्याशी करणे.
- बाळाला अतिशय चॉकलेट्स देऊन खराब करणे.
- घरातील भांडणे:
- सासू-सासरे यांची भांडणे मोठ्यावाजवी, शिव्यागाळीत, अगदी मारामाऱिपर्यंत जातात—आणि ते सून, मुलगा, नातू यांच्या समोरच.
- सुनेच्या माहेरच्यांचा अपमान करणे.
- माहेरी जाण्यावर नियंत्रण:
- सुनेच्या बहिणीच्या लग्नासाठी ३-४ दिवस आधी माहेरी जाण्याची अपेक्षा—पण सासू-सासऱ्यांची परवानगी घेऊनच. १०-१५ दिवस माहेरी राहण्याची परवानगी नाकारणे. "३-४ दिवस पुरेसे आहेत, जास्त दिवस का?" अशी वृत्ती. सून १०-१५ दिवस माहेरी जाऊन राहू शकत नाही का? ते पण बहिणीच्या लग्नानिमित्त? असा कुठे रुल लिहला आहे का कि ३-४ दिवस आधीच माहेरी गेले पाहिजे? नक्की काय प्रॉब्लेम आहे जर सून १०-१५ दिवस माहेरी गेली तर? मला तरी अजून कळले नाही आणि कुणी समजून सांगेल असा पण वाटत नाही.
शेवटचा विचार
लग्नानंतर आई-वडिलांच्या स्वभावाचे हे नवे पैलू दिसल्यावर, त्यांच्याबद्दलचा आदर कमी होणे स्वाभाविक नाही का?